फेमस कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. तथापि १५ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर आता राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. असे पहिल्यांदाच झालेले नाही तर जेव्हा सेलेब अशाप्रकारे मूत्यूला चकमा देऊन पुन्हा परतले आहेत. अमिताभ बच्चन पासून ते साई धरम तेज आणि प्रीती झिंटासारखे कलाकार साक्षात यमराजचे दर्शन करून परतले आहेत.
राजू श्रीवास्तव: कॉमेडियन राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. १५ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर राजू यांनी अखेर मृत्यूची ही लढाई जिंकली असून त्यांना शुद्धी आली आहे.
साई धरम तेज: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टॉलीवुडचा सुपरस्टार साई धरम तेज अपघाताचा बळी पडला होता. अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि अनेक दिवस तो आयसीयूमध्ये होता.
शबाना आजमी: १८ जानेवारी २०२० रोजी शबाना आजमीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला होता. या दुर्घटनेमध्ये ती गंभीररिया जखमी झाली होती. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तिला सुट्टी मिळाली होती.
अमिताभ बच्चन: महामारीच्या पहिल्या लाटेत अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा फटका बसला होता यादरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती, मात्र बिग बींनी हार मानली नाही आणि कोरोनावर मात करून ते बरे झाले.
ऋषि कपूर: ऋषि कपूर आपल्यामध्ये नाहीत पण बॉलीवूडचे दिग्गज स्टार ऋषि कपूर यांनी कर्करोगावर मात केली होती. जवळ जवळ एक वर्ष त्यांनी न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर इलाज केला होता. हळू हळू ते यामधून रिकवर देखील झाले होते.
प्रीती झिंटा: अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील मृत्यूला चकमा दिला आहे. श्रीलंकाच्या कोलंबोमधील एका शोमध्ये प्रीति परफॉर्म करण्यासाठी पोहोचली होती. पण प्रीती जेव्हा परफॉर्मन्स संपवून बॅक स्टेजवर पोहोचली तेव्हा शोमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यानंतर संपूर्ण बॉलीवूड हादरले होते.
महिमा चौधरी: १९९९ मध्ये दिल क्या करे चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अभिनेत्री महिमा चौधरीच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. एका मुलाखतीमध्ये महिमाने याचा खुलासा करत सांगितले होते कि तिची सर्जरी केली आणि चेहऱ्यामधून ६७ काचांचे तुके बाहेर काढले.
सनी लियोन: अभिनेत्री सनी लियोनने देखील मृत्यूला चकमा दिला आहे. वास्तविक सनी लियोन आणि तिचा पती एका विमान अपघातात मरता-मरता वाचले होते. या प्राणघातक अपघातामधून पायलट देखील सुखरूप घरी पोहोचला होता.