झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राशी आता प्रेक्षक रिलेट करू लागले आहेत. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीने आपलं काम अगदी चोख केलं आहे. या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता असते. महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची भूमी.. देशासाठी प्राणपणाने लढणारे वीर या महाराष्ट्रात जन्मतात. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात असं न म्हणता माझ्या घरात निदान एक तरी शिवाजी जन्मावा असं मानणारी एक पिढी नाही तर पिढ्यानपिढ्या.. आणि एक घर नाही तर संपूर्ण गावच्या गाव अस तं ते महाराष्ट्रातच!
महाराष्ट्राच्या शूरवीरांना मानवंदना देणारी, त्या वीरांचा गौरव करणारी ‘लागिरं झालं जी’ ही एक आगळीवेगळी मालिका झी मराठीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता अवतरत होती. वेगळे विषय आणि नाविन्यपूर्ण कथा याबरोबरच जिवंत सादरीकरण या नेहमीच झी मराठीच्या जमेच्या बाजू राहिल्या आहेत. याच परंपरेत आता एक नवा अध्याय लिहिला जात आहे तो “लागिरं झालं जी” या मालिकेचा!